MR/Prabhupada 0072 - सेवकाचे काम आहे शरण जाणे

The printable version is no longer supported and may have rendering errors. Please update your browser bookmarks and please use the default browser print function instead.


Lecture on CC Madhya-lila 20.108-109 -- New York, July 15, 1976


तर प्रत्येकजण मालक बनू शकत नाही . ते शक्य नाही . तुम्हाला हे निर्देश आढळतील ,

एकले ईश्वर कृष्ण आर सब भृत्य (चै च आदि ५।१४२ )

फक्त कृष्ण मालक आहे , आणि इतर सर्व सेवक . हि आपली खरी स्थिती आहे . पण आपण कृत्रिमरीत्या मालक बनण्याचा प्रयत्न करत आहोत . तो अस्तित्व टिकवण्याची खटाटोप आहे . आपण जे नाही आहोत ते बनण्याचा आपण प्रयत्न करत आहोत . आपण हा शब्द जाणतो , " अस्तित्वासाठीची खटाटोप " , "शक्तिमान असणाऱ्यांचा टिकाव " तर हे प्रयत्न ..आपण मालक नाही आहोत , तरी आपण मालक बनण्याचा प्रयत्न करत आहोत . मायावद तत्वज्ञान , ते सुद्धा खूप खडतर साधना आणि त्यागातून जातात . पण उद्देश काय आहे ? उद्देश हा आहे की " मी ईश्वरासोबत विलीन व्हावे " तीच चूक . तीच चूक . ते परमेश्वर नाहीत , पण ते परमेश्वर बनण्याचा प्रयत्न करत आहेत . जरी त्याने खूप खडतर साधना केली आहे , वैराग्य , त्याग सर्व काही ... काही वेळा ते सर्व भौतिक आनंदचा त्याग करून जंगलात जातात , विविध तपस्या करतात . पण उद्देश काय आहे ? " आता परमेश्वर आणि मी एक बनावे ." तीच चूक . तर माया खूप प्रबळ आहे . इतकी कि एखादा तथाकथित आध्यात्मवादात अग्रेसर असूनहि या चुका घडतच राहतात . नाही . म्हणून चैतन्य महाप्रभु त्यांच्या निर्देशातून त्वरित मुख्य मुद्द्याला स्पर्श करतात . ते चैतन्य महाप्रभूंचे तत्वज्ञान आहे . जिथे कृष्ण शेवटी म्हणतो ,

सर्व धर्मान परित्यज्य माम एकं शरणं व्रज ...(भ गी १८।६६ )

तो स्थितीविषयी बोलत आहे ; तो कृष्ण आहे , परम ईश्वर . तो विचारत आहे , मागत आहे , "तुम्ही धूर्त , सर्व त्याग करा .फक्त मला शरण या . मग तुम्ही सुखी व्हाल ." हा भगवद गीतेचा निर्देश आहे . चैतन्य महाप्रभु , जे तोच कृष्ण आहेत , पण कृष्णाच्या भक्ताच्या भूमिकेत आहेत . म्हणून तेही तेच सांगत आहेत . कृष्ण म्हणाला " तुम्ही शरण या " आणि चैतन्य महाप्रभु म्हणाले "प्रत्येक जीव हा कृष्णाचा सेवक आहे ." याचा अर्थ त्याने शरण गेले पाहिजे . सेवकाचे काम आहे शरण जाणे , विनंती करणे किंवा दावा करणे नाही , कि " मी तुझ्या समान आहे " या सर्व वेड्या , मूर्ख सूचना आहेत .

"पिसाचि पाइले येन मती-छन्न हय माया-ग्रस्त जिवेर से दास उपजय" (प्रेम-विवर्त, (श्री भा ७।२।२३ )


सेवक मालक बनू शकत नाही . ते शक्य नाही . पण जसे.. जितक्या वेळेपर्यंत आपण जीवनाच्या या चुकीच्या धारणेशी चिटकून राहाल कि , "मी सेवक नाही , मी मालक आहे " मग त्याला यातना भोगाव्या लागतील . माया त्याला दुःख देईल . दैवी ह्य इशा (भ गी ७।१४ ). जसे लुटारू , धूर्त ,चोर , ते सरकारी आज्ञेचा विरोध करतात : "मला शासनाची काही पर्वा नाही " पण याचा अर्थ तो स्वेच्छेने यातना भोगण्यास तयार होतो . त्याला सरकारी नियमांचे पालन केले पाहिजर . जर त्याने सहजच नियम पाळले नाहीत , बेकायदा काम केले , तर त्याला तुरुंगात टाकण्यात येते . आणि बळजबरीने , शिक्षा देऊन त्याला स्वीकार करावा लागतो : " हो, मी मान्य करतो ." तर ही माया आहे .

दैवी हय ईश गुणमयी मम माया दुरत्यया (भ गी ७।१४ ) आपण मायेच्या अधिपत्याखाली आहोत .
प्रक्रते क्रियमाणानी गुणिह कर्माणी सर्वशा (भ गी ३।२७ )

का ? कारण आपण मालक असल्याचे घोषित करत आहोत सेवक मालक बनण्याची घोषणा करीत आहे; म्हणून दुःखी होत आहे आणि जेव्हा आपण स्वीकार करतो की "मी मालक नाही, मी सेवक आहे" तेव्हा यातनांतून मुक्ती मिळते . खूप सोपे तत्वज्ञान आहे ती मुक्ती आहे . मुक्ती म्हणजे योग्य स्तरावर येणे . ती आहे मुक्ती . मुक्तीचा अर्थ भगवद्गीतेत सांगितला आहे ,

मुक्तिर् हित्वा अन्यथा रूपं स्वरुपेण व्यवस्थिति:(भ गी ३।२७ )

मुक्ती म्हणजे हा मूर्खपणाचा व्यवसाय सोडणे, अन्यथा तो सेवक आहे, पण तो विचार करत आहे मी मालक आहे . ते अन्यथा आहे अगदी उलट . तर जेव्हा तो जीवनाच्या या विरुद्ध धारणा सोडतो की तो मालक आहे, मग तो मुक्त होतो ; तो त्वरित मोक्ष प्राप्त करतो . मुक्ती इतका वेळ घेत नाही की तुम्हाला इतक्या कठीण तपस्या कराव्या लागतील आणि जंगलात जा , हिमालय कडे जा आणि ध्यान करा आणि आपले नाक दाबाआणि इतर बऱ्याच गोष्टी . त्याला इतक्या गोष्टींची आवश्यकता नाही , फक्त तुम्ही साधी गोष्ट समजून घ्या , कि " मी कृष्णाचा सेवक आहे " - तुम्ही त्वरित मुक्त व्हाल तीच मुक्तीची व्याख्या दिली आहे श्रीमद- भागवातम मध्ये . मुक्तिर् हित्वा अन्यथा रूपं स्वरुपेण व्यवस्थिति: जसे एखादा गुन्हेगार तुरुंगात , जर तो नम्र होऊन मान्य करत असेल "मी यापुढे कायद्याचे पालन कारेन . मी आज्ञाधारकपणे सरकारी कायद्यांचे पालन करीन " त्याने असे घोषित केल्याने कधी कधी त्याला आधीच सोडले जाते . तर आम्ही भौतिक अस्तित्त्वाच्या या तुरुंगाच्या घरातून ताबडतोब मुक्त होऊ शकतो जर आपण चैतन्य महाप्रभुची शिकवण स्वीकारत असू तर,

जीवेर स्वरूप हय नित्य कृष्णेर दास (चै च अादि २०।१०८-१०९ )